हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रहिवासीअब्दुल लतीफ शेख हा तरुण आरटीओ ऑफिस चंद्रपूर येथून २० दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झाला आहे तशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे बेपत्ताची दिलेली आहे. मात्र वीस दिवस उलटूनहि त्याचा काही थांग पत्ता लागत नसल्याने त्त्याची आई आसमा कौसर हिने माझा मुलगा बेपत्ता नसून त्याचा अपहरण तर करण्यात आले नाहि ना अशी शंका व्यक्त केली आहे.
अब्दुल लतीफ शेख हा राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे राहत असून त्याचे वय 26 वर्षे आहे. तो आरटीओ ऑफिस चंद्रपूर येथे एजंटचे काम करत होता दिनांक 6 नोव्हेबर रोजी तो नेहमी प्रमाणे कामावर गेला होता मात्र घरी आलाच नाही अब्दुलच्या आईने फोन केला असता फोन बंद दिसत होता तशी त्यांनी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे केली. माझ्या मुलाचा कोणाशी वाद नव्हता मात्र अचानक बेपत्ता होणे हे आमच्यासाठी चिंताजनक असून त्याचे अपहरण तर करण्यात आले नाही ना अशी शंका तअब्दुल ची आई सलमा कौसर हिने व्यक्त केली असून रामनगर पोलीसानि त्यांचा माझ्या मुलाचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

