भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर जिल्हा भंडारा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व आत्मसन्मान दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय रामटेके, माजी गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून महादेव घरडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, मोदकराज रामटेके, महादेवजी सुखदेवे, खुशाल बोरकर, शंकर मेश्राम, रामकृष्ण बनकर, प्रल्हाद बोरकर, मार्कंड दहिवले, गुलाब टेंभुर्णे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कमला हुमने, मंजूताई गजभिये, मनोरमा बोरकर, शारदा लांडगे, चंद्रभागा टेंभुर्णे, अल्काताई मडामे, जिंदाताई कराडे, रक्षिका वासनिक, रत्नाताई दहिवले, दीपमाला लांडगे हे उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अगरबत्ती, मेणबत्ती, पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी महादेवजी घरडे यांनी शूरवीर महारांचा इतिहास कथन केला. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध यात महार शूर सैनिकांचा सहभाग युद्ध जिंकण्यात होता असे प्रतिपादन केले.
शौर्य दिनानिमित्त अजय रामटेके यांनी भीमा कोरेगाव चे युद्ध ,तत्कालीन परिस्थिती आणि आजचे वास्तव यावर प्रकाश टाकला . सिद्नाक याच्या कर्तुत्वाचे कौतुक करण्यात आले. भीमा कोरेगावच्या स्तंभावर वीस शहिदांचे व तीन जखमी शिपाई यांचे नाव कोरले आहेत त्यांचे वाचन अजय रामटेके यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन त्रिरत्न बुद्ध विहाराचे अध्यक्ष मोदकराज रामटेके यांनी केले. व आभार प्रदर्शन शंकर मेश्राम यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने शहिदांना मानवंदना देण्यात आली. खुशाल बोरकर, शंकर मेश्राम, अजय रामटेके, मंजूताई गजभिये यांनी लाठीकाठीचे प्रदर्शन केले.

