पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या हत्याच्या घटनेमुळे नागपूरकर दहशतीत आहे.
नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई – वडिलांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना खसाळा कॅम्पसमध्ये घडली असून लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी हत्या करण्यात आलेल्याची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे.
प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले लीलाधर डाखोडे हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा डाखोडे या विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन केला.
हत्या करण्यापूर्वी आरोपी उत्कर्ष याने 26 डिसेंबरला सकाळच्या सुमारास आपली धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते. सेजल BAMS चे शिक्षण घेत होती आणि ती वर्धा रोडवर असलेल्या कॉलेजमध्ये जाते. उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे 1.00 वाजताच्या दरम्यान त्याने प्रथम आपल्या जन्मदात्या आई अरुणाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. 5.00 वाजताच्या दरम्यान वडील लीलाधर त्यांच्या ड्युटीवरून घरी आले त्याचवेळी आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन घेऊन कोराडी येथे राहणाऱ्या आपल्या मामाकडे गेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात आहे व बहिणीला काकाकडे सोडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेले असता, शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास आहे.

