महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमृतसर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पवित्र सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर टाऊन हॉलजवळ असणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड एका माथेफिरुने रविवारी केली. त्यामुळे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी विचारांच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी अमृतसरच्या टाऊन हॉल येथील सुवर्ण मंदिराजवळील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठित पुतळ्याची तोडफोड एका व्यक्तीने केली. या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीचे नाव आकाशदीप सिंग असे आहे, जो धरमकोट येथील भूपिंदर सिंग यांचा मुलगा आहे. आकाशदीप सिंग हा एका उंच शिडीवरून चढून हातोड्याने पुतळा तोंडतांना दिसत आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने पुतळ्यासमोर दगडात कोरलेले संविधान पुस्तक प्रतिकात्मकपणे जाळले. ही घटना दुपारी 3 वाजता सुवर्णमंदिराकडे जाणाऱ्या वर्दळीच्या हेरिटेज स्ट्रीटवर घडली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामुळे हा रस्ता पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यात तरुण 10 फूट उंचीच्या पुतळ्यावर बसून त्याच्या शिखरावर हातोडा मारताना दिसत आहे. पाहणाऱ्यांनी खाजगी सुरक्षा रक्षकांना सावध केले. सुरक्षारक्षकांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. जेव्हा तो खाली उतरला तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमृतसर पोलिस करत आहेत.
तोडफोडीची बातमी पसरताच, अमृतसरमधील विविध दलित संघटनांचे सदस्य पुतळ्याजवळ जमले आणि धरणे आंदोलन करत घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत होते. हा प्रकार संतापजनक असून सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी काही समाज विघातक वृत्तीच्या इसमांनी ही घटना घडवून आणली आहे. संबंधित आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकरी विचारांच्या लोकांनी

