अवैध वाळू उपसा करणाऱ्या भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टर मुळे नागरिकांच्या मुलाबाळांच्या जीवितास धोखा.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील आनंदवाडी येथे मागील काही महिन्यापासून रात्रंदिवस जेसीबी द्वारे तीन ते चार ट्रॅक्टर नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करीत आहेत, गावातील नागरिकांनी महसुल विभाग व पोलीस विभागाला फोन द्वारे माहिती देऊन सुद्धा कार्यवाही होत नाही महसूल व पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही करत नाही, महसुल व पोलीस प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. काही अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरी पणामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफीयांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नाही.
रात्रंदिवस भर वेगाने चालणारे ट्रॅक्टर गावातील मुला बाळांचा जीव घेऊ शकतात यांच्यावर वेळेत कारवाई केली नाही तर गावातील नागरिकांचा जीव जाऊ शकतो महसूल व पोलीस प्रशासन यानी तत्काळ लक्ष घालावे व या अवैध वाळू उपस्याला आळा घालावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

