मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे दिनांक 08 फेब्रुवारी 2025 रोजी विद्या भारतीच्या वतीने अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला भारत विद्यालयातील वर्ग 5 ते 9 वीचे 100 टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षा केंद्राला विद्याभारती विदर्भ प्रांताचे सहमंत्री बळीराम चव्हाण, जिल्हा प्रमुख गजानन सयाम, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिष भटटड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, संस्कृती ज्ञान परीक्षा प्रमुख श्रावण कुडमेथे, ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कोंडावार यानी भेट दिली.
यावेळी सहमंत्री बळीराम चव्हाण माहिती देताना म्हणाले की संस्कृती ज्ञान परीक्षा हा एक उपक्रम देशभरातील अनेक विद्यालयात सन 1980 पासून मोठ्या प्रमाणावर विद्या भारती राबवित आहे. भारताची महान आध्यात्मिक संस्कृती, थोर परंपरा, जीवनमूल्ये व थोर पुरुषांचे आदर्श त्यांच्या जीवनगाथा आणि येथील ज्ञानगंगा आपल्या देशाचेच नव्हे तर जगाचे श्रेष्ठ धन आहे. त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान- विज्ञानाच्या अभ्यासक्रमा बरोबरच करून दिला तर विद्यार्थ्यातील राष्ट्राभिमान जागृत करता येईल, समृद्ध व विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचा पाईक होण्याची पात्रता विद्यार्थ्याच्या अंगी यावी या उद्देशाने विद्या भारतीच्या वतीने विदर्भात अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन गेल्या 28 वर्षांपासून केले जात आहे.
हिंगणघाट येथिल प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालणाऱ्या 9 ही शाळेतील वर्ग 3 री ते 9 वी पर्यंतेच्या विद्यार्थ्यानी 100 टक्के सहभाग घेतला असून यांच्या सह तालुक्यातील 30 शाळेनी यात सहभाग घेतला असुन संस्कृती ज्ञान परीक्षेला 5000 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे.

