Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

उत्सव करा हो!! पण असा उत्सव नको कि ज्याने इतरांना त्रास होणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 23, 2022
in Uncategorized, तंत्रज्ञान, देश विदेश, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
उत्सव करा हो!! पण असा उत्सव नको कि ज्याने इतरांना त्रास होणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखिका:✍️सुप्रिया ढोके, राह. नागपूर

मला आजपर्यंत कळाले नाही की इतके त्रासदायक कर्ण कर्कश फटाके आणि त्यातून निघणारी विषारी धूळ आणि धूर यांचा नेमका काय फायदा होतो जे प्रत्येक उत्सव, सण किंवा कार्यक्रम यांच्या शिवाय केलं जाऊच शकत नाही?? दुसरे म्हणजे अतिजास्त कर्ण कर्कश आवाज करून डीजे सोबत रंगबी रंगी लएडी बब्ल लावून काय सोंग केली जातात?? खरच यांची गरज असते काय प्रत्येक सणा करिता??म्हणजे हे सगळं सोंग नाही केली तर आपले सण साजरे नाही होणार असं म्हणणं होत काय? माफ करा मग ज्या घरी कोणी मरण पावतो त्याच्या मरणा ला हि असेच डीजे आणि मोठाली फटाके नक्कीच लावून गाजा वाजा करायला हवी कि नाही ?? अहो, जस तुमचे आनंद या सोंगाने द्विगुनी होत तसेच दुःख हि द्विगुनी करायला हवे की नाही??? नशीब!! त्या दिवशी तरी असली सोंग नाही करत नाही तर शांती हि कुठेच भेटली नसती या पृथ्वीतलावर असं मला तरी वाटते.

इथे गोष्ट फक्त दिवाळीची नाही बर का ! हि त्या प्रत्येकच उत्सवाची आहे ज्यात हे त्रास सहन शक्ती पलीकडे होऊन जात चाललंय. लोक म्हणतात आनंद साजरा करतो आम्ही, मी म्हणते की जितके तुम्ही पैसे अशा फटक्यात घालवत जे उडवून फक्त तुम्हाला काही क्षणच आनंद मिळतो पण सत्य हे असत कि तुम्ही काही आजार त्या सोबत आणता हे तुमच्या लक्षातच येत नाही या मूर्खतेला आपण आनंद म्हंटल तर कस वाटेल?

आपण जिथे राहतो ते घर असत त्यात म्हातारी माणसे हि असतातच न? काही तर माझ्या सारखी तरुण असून ही ह्या सगळ्याचा त्रास सहन करू शकत नाहीत. कारण काय तर प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ठ प्रकृती बनलेली असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो आणि मग ते पटकन आजारी पडत असतात जशी कि मी, कोरोनाची लस घेतल्यापासून प्रत्येक व्यक्ती ची एकच तक्रार येतांना दिसते पूर्वी सारखं तरतरी नाही वाटत लवकर आजारी पडते, दम लागतो, हाडे दुखतात, जरा सुद्धा फोडणीचा किंवा धुळीचा वास सहन होत नाही, अति आवाज ऐकणे होत नाही, हृद्याचे ठोके वाढायला येते, डोकं दुखते, वगैरे वगैरे अर्थातच सांगायचं हेच कि दोन वर्षे आपण पिंजऱ्यातला पक्षी बनून जे निसर्गावर उपकार करत सगळ्या प्रदूषणातून मुक्त केलं आता पुन्हा तेच प्रदूषण करून माती खाऊ नका, कारण आज जे कराल उद्या नक्कीच भोगावे लागणार मागील दोन वर्षात आपण प्रत्येक गोष्ट जवळून अनुभवली असेलच, सगळ्यांनीच आपल्या जवळची माणसे हि गमावली असेलच, तर मग त्यातून हि आपण काहीच शिकलो नसेल तर नवलच बरे ?

आयुष्य एकदाच मिळत हे माहित असून ही आपण निसर्गाला परत फेड म्हणून सुंदर आणि स्वच्छ पर्यावरण सुद्धा देऊ शकत नाही याच खूप दुःख वाटते.तासाभर साठी चा आनंद उत्सव हा कुणाच्या जीवावरही बेतू शकतो आणि पर्यावरण दूषित हि करू शकतो ह्याच जागरूक आणि सचेत नागरिक म्हणून मी तरी असे प्रदूषण न करण्याचा संकल्प घेऊन ते न चुकता दर वर्षी माझ्या कुटुंबा सोबत शांततेत दिवे, फुल, फळे, गोड -धोड वाटून साजरे करत असते यात कुणालाही कुठला त्रास होत नाहीच वरतून तीन दिवासाने वाळून गेलेली फुले हि माझ्या अंगणातील कुंड्यात प्रेमाणे त्याच सुकलेल्या फुलांची एक- एक पाकळी मोकळी करून माती मध्ये त्यांना पुरून त्यांची सुंदर रोपटी बनवते जी मोठी होऊन सुंदर फुलं देतात आणि आमच्या घराची शोभा वाढवतात सोबत निसर्ग हि आनंदित होतो.

बरं हे तर झाल माझ आणि माझ्या घरच उदाहरण पण तुम्हाला तरी वाटत काय माझ्या एकटीच्या संकल्पाने आपला परिसर किंवा हा निसर्ग वाचू शकतो?? नाही न ?मग दोन वर्षी जे शांती पूर्ण उत्सव साजरी केली तशीच आपल्या मुळे इतरांना आपल्या परिसरातील रुग्णांना, आजी – आजोबांना त्रास नाही होणार याची नक्कीच जाणीव ठेवून उत्सव साजरा केला गेला तर काय बिघडणार?? उलट सगळं वातावरण सुंदरच होणार हे नक्की. दवाखान्याच्या परिसरा जवळ तर अजीबात फटाके आणि डीजे बंद करायला हवी परंतु याच्या विरुद्धच चित्र बघायला मिळते किती दुःखाची गोष्ट आहे की रुग्ण त्यांच्या त्रासात असतात आणि बाहेर रस्त्याने कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवत ज्यांचे शब्द कमी आणि दणके च आपल्या हृदया ला जोरा जोरात फटके मारल्या सारखे जाणवतात असला कुठला आनंद असतो काय??तुम्हीच विचार करा आणि ठरवा.

स्वतः तर आनंदी रहाच पण सोबत इतरांना ही आनंद वाटा अगदीच जास्त पैसा झाला असेल आपल्या खिशात मावत नसेल तर फटाक्याच्या स्वरूपात पैसा जाळून रस्त्यावर कचरा पसरवण्या पेक्षा एखादया गरिबाला त्या दिवशी दान करून पुण्य नक्की कमवू शकता यातून कुणाला त्रास तर होणार नाहीच उलट तुम्ही त्यांना जे उत्सव साजरे करायला मदत केली याच त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान आणि आनंद नक्कीच दिसेल बघा तर करून एकदा खरे।

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

“फुरसुंगी ग्रामदैवत शंभु महादेव मंदिर, या मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून काहि तासांमध्ये उघड”

Next Post

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In