तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील कोलगाव हे गाव नदीच्या काठावर वसलेले असून दर वर्षी पुरामुळे शेतमालाचे व गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे कित्तेकदा पुरात लटकल्याने गावाला हवाई मार्गाने अन्न पुरवठा पण करण्यात आलेला आहे.
अशा दयनीय अवस्थेत असलेल्या गावाला धोपताला ‘युजी टू ओसी’ या प्रकल्पाचे काम सुरु होऊन नदी पात्राजवळ परिसरात मातीचे ढिगारे टाकल्या जात असल्याने गावाकऱ्यांची चिंता वाढली आणि भविष्यात मोठ्याप्रमाणात जीवीत हानी होण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने अडीच शे एकर जवळपास शेती उर्वरित असल्याने गावाकऱ्यांना गाव सोडून जाने हेही शक्य होत नव्हते. अशा प्रसंगी कोलगावचे माजी सरपंच तथा उपसरपंच पुरुषोत्तम लांडे तथा त्यांचे कार्यकर्त्यांनी माजी सभापती सुनील उरकुडे तथा भाजपचे मधुकर नरड, प्रशांत घरोटे यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या वारंवार भेटी व अहिर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखली वेकोलीच्या क्षेत्रीय कार्यालयात महाप्रबंधक श्री. डे यांच्या सोबत वारंवार बैठका लावून वेळा काम बंद आंदोलने करत शेवटी वेकोली कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला.

त्या निर्णयानुसार कोलगाव वेशीतील उर्वरित शेती अधिग्रहन् करून गावाचे इतरात्र पुनरवसन करण्यात येणार आहे अशा मोठ्या निर्णयासाठी सभपती सुनील उरकुडे व सरपंच पुरुषोत्तम लांडे सह भाजप चे पदाधिकारी मधुकर नरड, प्रशांत घरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रबंधक डे यांचे पुष्पगुछ देऊन आभार मानण्यात आले त्याप्रसंगी गावातील ग्रा.प सदस्य अक्षय निब्रड, शामराव दिवसे, रामदास मोरे, रमेश उरकुडे, निखिल वैद्य, सागर उरकुडे, बालाजी पिंपळकर, बालाजी काळे, जनार्दन देवाळकर, संजय पायगन, चंदू दिवसे, जग्गू लांडे, गणेश झाडे, राजू पिंपळकर तथा शेकडो गावकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

