Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

श्री संत कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सव, श्री कोंडय्या महाराजांनी पावन केले श्रीक्षेत्र धाबा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 18, 2023
in Uncategorized, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
श्री संत कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सव, श्री कोंडय्या महाराजांनी पावन केले श्रीक्षेत्र धाबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संतनगरी धाबा:- आत्म्याचे ज्ञान , आत्मबोध प्राप्त करण्यकरिता अंतःकरणात अध्यात्म्याची जोड तेवत ठेवली पाहिजे, तर अज्ञानाचा अंधःकार दूर होऊ शकते. याकरिता स्थिर निश्चयाने ध्यान करावयास हवे. श्रवण, मनन, चितन अशी साधने एकवटून देह परमार्थाकडे वाटचाल करतो. तेव्हाच सद्गुच्या दर्शनाची प्रत्यक्षानुभुती लाभते, ही मौलिक शिकवण देणारे संत परमहंस कोडय्या महाराज आज शरीर रूपाने आपल्यात नाहीत. पण त्यांच्या भक्तांनी त्यांची शिकवण आचरणात आणली आणि आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली . कोंडय्या स्वामींची योग समाधी (इ . स .1939) निर्वाणाला आज 83 पूर्ण झाली. वर्षागणिक धाबा हे कोंडय्या महाराजांचे समाधी स्थळ गोंडपिपरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून पावन झालेले आहे .

महाराष्ट्र शासनानेही या तीर्थक्षेत्राची दखल घेतली असून , मदतीचा हात पुढे घेतला आहे . माघ शुद्ध तृतीयेला मल्लयाला तिसरे पुत्ररत्न झाले . त्याचे नाव कोंडय्या. जन्मापासून त्यांनी बाललीला दाखविणे सुरू केले. जन्मताच ‘ कोंडय्या नमोः बसवय्या ‘ असे बोलले, बालपणापासून योग अभ्यासात गर्क, मग्न असलेल्या कोंडय्यांनी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे विवाह केला. पण पत्नीला त्यागून त्यांनी योगमार्ग पत्करला. ईश्वरी दृष्टांताने गुरु केला . कठोर व्रत व तप करीत त्यांनी गूळ व कडुलिंबाची पने खाणे सुरू केले. योगमार्ग हीच त्यांची उपजीविका झाली. सगुण – निर्गुणाचा अनुभव घेऊन येत असताना कुचाळक्या उनाडक्या करणाऱ्या नास्तिकांनी त्यांची हेटाळणी केली . ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेड्याच्या मुखातून वेद म्हणविले तसे आपण दगडाच्या नंदीला चारा खाऊ घालून दाखवा, असे आवाहन दिले. आपली ही परीक्षा आहे असे समजून कोंडय्याने सर्वांसमक्ष दगडी नंदीला गवत चारले, अशी आख्यायिका आहे. या चमत्काराने कोंडय्या महाराज महायोगी असल्याची सर्वांना खात्री पटली आणि नास्तिकही आस्तिक झाले . कोंडयांच्या योग सामर्थ्याची सर्वांना प्रचिती येऊ लागली. पापाचे, चुकीचे प्रायश्चित केल्यानंतर महाराजांच्या कृपेने लोक सद्वर्तन करू लागते. त्यानंतर अनेक चमत्कार कोंडय्या स्वामींकडून घडू लागले. याचे सुरस वर्णन कोंडय्या विजय ग्रंथात आढळते.

जगाच्या कल्याणात संतांची विभूती याची प्रचिती कोंडय्याने दाखविली . कोडय्या स्वामीनी धाबा येथे मठात प्रवचन देणे सुरू केले होते . आपले अवतार कार्य संपत आल्याचे त्यांनी ओळखले . भक्तगण दूरवरून भेटीकरिता येत , चिंता करू लागले . कोंडय्यांनी त्यांच्या अंतरीची तळमळ हेरली . त्यांनी सांगितले . शरीर त्याग करणे मला क्रमप्राप्त आहे . मी गेलो असे मानू नका , भक्तीत अंतर करू नका , मी सदैव आहे आणि राहीन . मला येथेच ( धाबा ) समाधी द्या . एक दिनी नित्यक्रम आटोपून महाराज आसनावर बसले आणि नमोः बसवय्या म्हणत देह त्यागला . कोंडय्या स्वामींनी देह विसर्जन केला तो दिवस ( कार्तिक शुद्ध तृतीया ) 14 नोव्हेंबर 1939 रोज मंगळवार होता . दरवर्षी घाबा येथे या दिवसापासून कोंडय्या महाराजांची यात्रा भरते . भाविक येतात आणि सद्गुरू चरणी लीन होतात . तेलंगणा- महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थाना कोंडय्या महाराज देवस्थान आहे .

यात्रा कालावधीत भाविक मोठ्या संख्येने येतात . सहा दिवस विविध कार्यक्रम येथे होतात . यात्रा कालावधीत विविध दुकाने या परिसरात लागतात . सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते . दरवर्षी मोठ्या श्रद्धेने भाविक धाबा येथे येतात . महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात .यावर्षी भव्य यात्रा महोत्सव दि.19 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत आहे. महोत्सवाला मोठया संख्येने भेट दयावे: अमर एम. बोडलावार अध्यक्ष (श्री संत कों म स धाबा )

–

Previous Post

शिर्डी प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन साईचरणी. परिवारासह घेतल साई बाबाच दर्शन.

Next Post

अंबुजा सिमेंट फाउंडेशन ऊपरवाही व भाग्यलक्ष्मी ग्राम संघ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अंबुजा सिमेंट फाउंडेशन ऊपरवाही व भाग्यलक्ष्मी ग्राम संघ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा.

अंबुजा सिमेंट फाउंडेशन ऊपरवाही व भाग्यलक्ष्मी ग्राम संघ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In