✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही विदर्भवाद्यांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कागद देखील भिरकावले. अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा सर्व विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचं गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटलं.
विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. तसेच विदर्भा तील शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि आपल्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भावाद्यांनी आंदोलन केलं. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणालं की, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवाद्यांना केलं.

