नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- उपनगर असलेल्या अंबरनाथ मधिल पालेगाव व फणसीपाडा या गावालगत असलेल्या शासनाच्या मालकीच्या गुरचरण जमिनीचा गावठाणात समावेश करून या गावांची हद्दवाढ करण्यात यावा अशी मागणी केली. यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी आश्वासन दिले.
तसेच अंबरनाथ येथील वडवली विभागातील शासनाच्या मालकीचा सूर्योदय सोसायटी भूखंड क्र.६०६ येथे जेष्ठ नागरीकांकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत “विरंगुळा केंद्र” उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच उल्हासनगर – ५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, पटेलनगर मधील शासनाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या व सद्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीच्या ठिकाणी एम.पी.एस.सी. व यु.पी.एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र,
तसेच उल्हासनगर -५ येथील लालचक्की परिसरातील बरेक नं.२१०८ च्या बाजूला असलेल्या शासनाच्या मोकळ्या जागेत “सिंधू भवन व यात्री निवास” उभारण्याकरिता, आणि त्याचबरोबर उल्हासनगर – ५ येथील कैलाश कॉलनी मार्गे मठमंदिर दुधनाकाकडे जाणारा रस्ता आणि नेताजी चौक ते मठ मंदिर मार्गे तहसील कार्यालय आणि निजधाम आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्याचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत काँक्रीटी करण करण्यात येणार असून याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना जिल्हाधिकारी श्री. शिणगारे यांनी दिल्या आहेत.
»

