सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9864268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व राहुल पुगलिया, करण पुगलिया यांच्या नेतृत्वात युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांनी युवक कांग्रेस,एन.एस.यु.आई च्या वतीने सोमवारी ६ फेब्रुवारीला बल्लारपुर शहराच्या एसबीआय व एलआयसी च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली.
या आंदोलनात पुरोगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा सलाहकार नाना बुंदेल, शंकर महाकाली, अरबाज़ सिद्दीकी, अजय रेड्डी, प्रीतम पाटणकर, दानिश शेख, सुनील मोतीलाल, जिशान सिद्दीकी, सोहिल खान, विकास श्रीवास, विककी गुजरकर, अक्षय गोड़मारे, रोशन ढेगड़े, अज़हर शेख, राजा केशकर, बब्लू प्रसाद, सूरज गेडाम, रोहिल खन्ना, रूपेश भोयर, सुमित ढेठे, शशि कोटवार, रोहिन सक्सेना, राजेश केसकर, कुशल वर्मा, निखिल वाड़के युवक काँग्रेस व एन.एस.यु.आई सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण देशभरात अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे. संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. म्हणून युवक कांग्रेस व एन. एस. यू.आईतर्फे धरना प्रदर्शन करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348