शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई यावर बोलावयास सरकार गप्प डॉ.आशाताई मिरगे राज्य निरीक्षक रा. महिला काँग्रेस.
✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हान यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनजागरण यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृवात आंबेडकर चौक येथे सभा घेण्यात आली.
याकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य निरीक्षक डॉ.आशाताई मिरगे, विभागीय अध्यक्षा डॉ.सुरेखाताई देशमुख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सिलिंडर दरवाढ, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असे विविध प्रश्न घेऊन नागरिकांमध्ये जनजागर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हान यांच्या नेतृत्वात जनजागरण यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून हिंगणघाट येथे पोहचली असता प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जनजागरण यात्रा हिंगणघाटला पोहचली असून यात्रेचा समारोह शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत वर्धा येथे होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. जनतेला एल्गार करण्यासाठी जनजागरण यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचे मत युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी वक्त केले.
सत्तेचा गैरवापर करत ही सरकार स्थापन झाले असून महाराष्ट्रात बेरोजगारी, दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कबंरडे मोडले आहे. सरकारमुळे बेरोजगार युवकांना रोजगारा पासून वंचित राहावे लागत आहे केंद्र सरकार जाती धर्मात तेढ वाढवून सत्तेच्या गैरवापर करत असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात डॉ.आशा मिरगे यांनी केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग,माजी सरपंच प्रशांत घवघवें, समाजसेवक अनिल लांबट, विजय तामगाडगे, पुरुषोत्तम कांबळे यांची उपस्थिती होती. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता सातपुते तर आभार प्रदर्शन शबुक्ता शेख यांनी केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगणघाट शहर अध्यक्षा सौ मृणालताई रिठे, विधानसभा अध्यक्ष निताताई गजबे, उपाध्यक्ष सिमाताई तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष सविताताई येळणे, उपाध्यक्ष कविताताई मुंगले, जिल्हा सचिव भारतीताई घुगंरुड, सरचिटणीस सुजाताताई जांभुळकर, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, उपाध्यक्ष रजनीताई महाकाळे, तालुका उपाध्यक्ष मिनाक्षीताई धाकने, तालुका सचिव सुचिता सातपुते, शहर सचिव अर्चना नांदूरकर, माधवीताई देशमुख यांनी परिश्रम घेतले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348