Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

नागपूरात रानभाजी महोत्सव थाटात साजरा. माजी मंत्री सुनील केदार यांचे हस्ते झाले उद्घाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 11, 2022
in महाराष्ट्र
0 0
0
नागपूरात रानभाजी महोत्सव थाटात साजरा. माजी मंत्री सुनील केदार यांचे हस्ते झाले उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter



देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर.

नागपूर:- श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे कापूस कामे सुरू झालेली असतात.अश्या वेळेस आदिवासी दिनानिमित्त दि.10/08/22 ला सरपंच भवण,सिव्हिल लाईन,नागपूर येथे जिल्हा स्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला मा.नामदार सूनीलबाबु केदार, पशू संवर्धन व क्रीडा मंत्री.नागपूर,जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.रश्मी ताई बर्वे, मा.कृषी सभापती, श्री.तपेश्वर वैद्य, मा.श्रीमती. कुंदाताई राऊत, श्रीमती. नागपुरे ताई,सर्व जिल्हा परिषद सदस्य, मा.प्रकल्प संचालक, आत्मा श्रीमती.डॉ.नलिनी भोयर, मा.विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी,श्री.मिलिंद शेंडे, मा.उप.प्रकल्प संचालक,श्री.शिवणकर, श्री प्रशांत शेंडे,सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक,सर्व आत्माचे कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमांमधून रानभाजी चे महत्व सागण्याचे व संदेश देण्यात आले… कुपोषन मुक्तीमध्ये या भाज्यामधील घटकद्रव्यांचा आवर्जुन विचार करायला हवा हा आग्रही वाढत आहे. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. यातील काही भाज्यामध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातुन विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील काटेरी प्रकारातल्या काही भाज्या काढल्यावर त्या खडयांचे मिठ घालुन उकळवून घेतल्या जातात. काही रानभाज्याच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरुन त्यांची विषारी- बिनविषारी गटात वर्गीकरण केले जाते.
रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात

रानभाज्याचे मध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य भरपूर प्रमाणात असते ते पचनसंस्थेसह शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. या ऋतुमध्ये रानभाज्याचे सेवन केल्यामुळे त्याचे शरीराला दिर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात. काही भाज्या थंड तर काही भाज्या उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळी सारख्या रानभाज्या आवर्जुन खालल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यामध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळयाची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट तुरट चविची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूच ची भाजी ही गवतासारखी असते त्यामुळे या अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात हा फरक सरावाने ओळखता येतो. शेवळ म्हणजे पांढऱ्या मशरुमचाच एक महत्वाचा प्रकार आहे. यात सेक्रोमायसीस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यामध्ये ही या इस्टचा नैसर्गिक थर असतो.या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर संक्रोमायसीसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होते. खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळे ही विकत घ्यायला हवित. त्यामुळे खवखवीसारखी लक्षणे नष्ट होतात. या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्याचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसात शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा.भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असतेऔषधी गुणधर्म देखील आहेत पातेरे, भारंग, बिडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्या पानाचा रंग गडद असतो. त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पोष्टीक गुणधर्मही अधिक असतात या भाज्याही उकडून शिजवल्या जातात करटोली सारख्या काटेरी फळ असणा-या भाजीमध्ये नैसर्गिक जिवणसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा माळा, पुननवर्वा, कडू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकनेरी, भोवरी या सारख्या भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नविन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरुपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात टाकळयाची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाकळयाची पानाचा लेप विविध त्वचा विकारावर लावतात. या भाजीला ‘तखटा’ असे ही म्हणतात.या भाज्यात करटोलीबाफळी, हेळू, कडमडवेली, आघाडा, गुळवेल, नळीची भाजी, मायाळू, सुरन कंद, केणा,अळू, शेवगा आदी रानभाज्या विविध रोगावर गुणकारी ठरल्या आहेत.तसेच रानभाज्यत्याचे आहारामध्ये सेवन करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.
रान भाजीपाला महो्सवानिमित्त हिंगणा तालुक्या तील प्रामुख्याने अन्नदाता शेतकरी स्व सहाय्य गट, कान्होलिबारा, नेरी मानकर, अडेगाव कवडस, मंगळूर येथील महिला बचत गटांचा विशेष सहभाग लाभला, रानातील भाजीपाला याचे विक्री करण्यात आली

Previous Post

भाजप महामंत्री सावनेर येथील तुषार ऊमाटे यांच्या तर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण.

Next Post

कळमेश्वर तालुका मराठी पञकार संघाच्या कार्यकारणीची गठण, अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अढावू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कळमेश्वर तालुका मराठी पञकार संघाच्या कार्यकारणीची गठण, अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अढावू.

कळमेश्वर तालुका मराठी पञकार संघाच्या कार्यकारणीची गठण, अध्यक्षपदी आशिष सौदागर तर सचिवपदी जयंत अढावू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In