आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत राष्ट्र समिति ची हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली. आता शेतकरी सरकार ही भुमिका घेत हिंगणघाट, समूद्रपूर, सिध्दि रेल्वे विधानसभा क्षेत्रातुन आजती या गावापासून भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे व माजी आमदार डाॅ. वंसतराव बोडे यानच्या नेतृत्वात ही सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली.
भारत राष्ट्र समिति पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सर्व जागा लढविनार आहे. त्या मुळे शेतकरी वर्गाने विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे, आजती गावातून मोहीमे सोबत मनिष कांबळे, मनोहर कोल्हे माजी संरपच मानतारे मॅडम, धनराज कोल्हे, लालजी वाघमारे, मनोहर कोल्हे, नाना बुचदेकर, किशोर कोल्हे, तुकाराम नरूले प्रकाश कोल्हे, दिगाबर बुटे, शालीकराव भोयर सह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

