रवींद्र भदर्गे, परतूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका काकाने आपल्याच पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. ही घटना जानेफळ दाभाडी येथे घडली असून त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
जानेफळ दाभाडी येथे शेतातील बांधाच्या वादावरून काकाने आपल्याच भावाच्या मुलाची निर्घृण हत्या केली करण्यात आहेत. पुतण्याची हत्या करणाऱ्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास मिसाळ असे मयत तरुणाचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील जानेफळ दाभाडी येथील शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा गट क्रमांक 35 मधील जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. तर दोघेही शेतात घर करून कुटुंबीयांसोबत राहतात. दरम्यान शुक्रवारी दोघांमध्ये बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात वाद शमला आणि अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी संशयित शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ यांचा जागीच जीव गेला. तर याची माहिती मिळताच नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले.
या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान याप्रकरणी मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आपल्या परिसरात बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

