Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

वर्धा समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 27, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त शरद चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी खा.रामदास तडस यांनी शाहू महाराज यांच्या जिवनातील महत्वपूर्ण व उत्कृष्ठ कामाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करुन दिली तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. छत्रपती शाहू महाराज रयतेचे राजा होते. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करून जनतेला शिक्षित केले. समान न्याय देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या. हेच ध्येय ठेऊन शासन सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहे. या शासकीय योजना शेवटच्या नागरिकां पर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक योजनांची माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी दिली व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शरद चव्हाण यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. दि.16 ते 26 जून या कालावधीत व्यसनमुक्ती पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज व्यसनमुक्तीची शपथ उपस्थितांना देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते परिवर्तन या पुस्तकाचे व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश, जात वैधता प्रमाणपत्र आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जमीन वाटपाबाबतचे सातबारा तसेच अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बचत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून खा.रामदास तडस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग नागपूर अंतर्गत सहाय्यक आयुक्त अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील मुलांचे शासकीय वसतीगृह उमरी मेघे, देवळी, पुलगाव येथे यापुर्वीच ई-लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. या ई-लायब्ररीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे फार्म भरणे, JEE, NEET, MHCET इत्यादी परिक्षांची पुर्वतयारी करणे, अभ्यास विषयक अवांतर माहिती गोळा करणे, ऑनलाईन क्लासेससाठी मदत होणार आहे. ई-लायब्ररीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक दृष्टीकोणातून त्यांचा विकास होण व त्यांचा अभ्यास होण्यासाठी महत्वाचे आहे, असे रामदास तडस यांनी सांगितले.

Previous Post

जालना जिल्हात कामाची मंजुरी एकीकडे बांधकाम दुसरीकडे जि. प बांधकाम उपविभागचा मनमानी कारभार!

Next Post

आदिवासींच्या नौकऱ्याची चोरी, संशयास्पद ‘कास्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदिवासींच्या नौकऱ्याची चोरी, संशयास्पद ‘कास्ट व्हॅलिडिटी’ असणारे 24 अधिकारी 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत.

आदिवासींच्या नौकऱ्याची चोरी, संशयास्पद 'कास्ट व्हॅलिडिटी' असणारे 24 अधिकारी 8 वर्षापासून आदिवासींच्या राखीव जागेवर कार्यरत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In