बाबुलतारा येथे पांदण रस्त्याच्या बोगस कामा संदर्भात तसेच ग्रामपंचायत च्या जागेवरील सरपंच यांनी अतिक्रमण केले आहे ते काढणे यासंदर्भात चंद्रभान आसाराम मुळे शिवसेना उपतालुका प्रमुख परतुर व विष्णू पिराजी जगताप यांचे पंचायत समिती परतूर कार्यालयापुढे आमरण उपोषण.
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील मौजे बाबुलतारा येथील ग्रामंचायत अंतर्गत 3 की मी पांदन रस्ता मंजूर आहे. सबंधी दोन किमी बाबुलतारा ते नांद्रा रस्त्याचे काम हे सन 2017 मध्ये पंचायत समिती परतुर अंतर्गत सभापती फंडामधून मुक्त झालेला होता परंतु सन 2023 मध्ये त्याच रस्त्याचे काम ग्रामपंचायत ने जेसीबी च्या साह्याने माती काम एक किमी केले असून व त्यावर प्रत्यक्षात त्यांनी मजूर न लावता जेसीबी लावून एका रात्रीत काम पूर्ण केले आहे आणि मजुराच्या नावाने मस्टर काढन्यात येत आहे.
तसेच दिलीप रावसाहेब लोहकरे यांची ग्रामपंचात हद्दीत अतिक्रमण करून जनावरासांठी गोठा केला आहे. रस्त्यावर पत्राचे शेडचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे गावात रहदारी करण्यासाठी गावकऱ्यांना अडचण होत आहे. तसेच गावामध्ये राहत्या घराच्या समोरील ग्रामपंचायत जागेवर तीन ते चार फूट मुरूम टाकला आहे व रस्त्यातच शौचालयाचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे शेतीत जाण्यायेण्या साठी तोच रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैल गाडी ने आन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.
दिलीप रावसाहेब लोहकरे हे आज रोजी या गावचे सरपंच असल्यामुळे गावातील लोक त्यांना सांगून सुद्धा ते ऐकत नाही या अगोदर पण परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार केली होती पण अद्यापही गटविकास अधिकारी यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या कार्य प्रणालीवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत कुठेही सूनवाही होत नसल्याने गावातील नागरिक आक्रमक झाले आहे. या विरोधात 03 जुलै पासून विष्णू पिराजी जगताप व चंद्रभान आसाराम मुळे आमरण उपोषणाला बसले आहे.

