महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन निमशिरगाव:- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक म्हणजे संविधान संकुल म्हणून आकार घेणार असलेली जागा असणार आहे. त्या जागेच्या संरक्षण कंपौंडला संविधान परिवार, इचलकरंजीच्या कार्यकर्ते यांनी सकाळी 67 झाडे आणि दुपारच्या सत्रात 25 अशी एकूण 92 झाडे लावली.
आज भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. कडक उन्हाळा, तापमान वाढ, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. वृक्षारोपण करण्याचे अनेक फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही.
आपण फक्त कल्पना करू जर आपल्या आजू बाजूला असलेल्या वृक्षांची संख्या दिवसेनदिवस कमी झाली तर काय होईल? आपल्याला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळणार नाही. वातावरणात अनेक विषारी वायूंचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढण्यासाठी मदत होईल. तापमानात वाढीच्या समस्येला समोर जावे लागेल. त्यामुळे संविधान परिवार इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण उपक्रम राबवून शेकडो झाडें लावली.
यावेळी संविधान संवादक सुनिल स्वामी, दामोदर कोळी, संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक अशोक वरुटे, आरिफ पानारी, साद चांदकोटी, संजय कुंभार, बाबुराव पाटील,महादेव केसरकर, सुमित मोकाशी, पांडुरंग खाडे आणि संजय रेंदाळकर सहभागी झाले. यावेळी झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया।। असे प्रतिज्ञा करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

