प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी करून अजित पवार यांनी आपल्या काही सहकारी आमदारा बरोबर वेगळी चूल मांडली आणि शिंदे फडणवीस बरोबर हाथ मिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून ती दोन्ही पवार मध्ये विभागल्या गेली आहे. याच प्राश्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामील असल्याचं गंभीर आरोप केला. जितेंद्र आव्हाड हे आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजितदादा गटाचे लोक 30 जून ला निवडणूक आयोगाकडे गेले आणि 5 जुलै ला निवडणूक आयोग सांगतंय की ते आमच्याकडं आले होते. का निवडणूक आयोगाला याआधी हे कळवता आलं नाही? म्हणजे हा कटाचा, षडयंत्राचा भाग आहे. यामध्ये इलेक्शन कमिशन देखील सामिल आहे. हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला बॅकडेटेट करायला किती वेळ लागतो?तुम्ही हेच प्रयोग कर्नाटकात, मध्य प्रदेशात, गोव्यात केलेत. पण सगळीकडून लोकांचा उद्रेक दिसतोय. लोकांना हे पटत नाही. सत्ताकेंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचं असेल तर हा देश तुटला म्हणून समजावं, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

