उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- फुले शाहू आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व लोक गुणागोविंदाने नांदत आहे. पण काही लोक विषारी मानसिकता घेऊन पक्षपातीपना आणि विष का असतात. त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाचे काम करत असतात.
ज्या प्रशासनाचे काम आहे सर्वांना न्याय देण्याचे ते प्रशासन अन्याय करत असेल तर न्याय मागायचा कुणाला हाच प्रश्न घेऊन सांगली जिल्हातील मिरज तालुक्यातील बेडगमधील आंबेडकरी समाजातील जवळपास 125 कुटुंबातील 800 लोकांनी आपल्या मुला बाळासह गाव सोडून न्याय मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समुदायात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे.
या गावकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण केले असून प्रशासनाकडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्याय मिळत नाही या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजाने थेट गाव सोडण्याचा निर्धार केला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये आंबडेकरी समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत पायी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एक महिन्यांपूर्वी गावात उभारण्यात येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतकडून पाडण्यात आले. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा विरोध सुरु झाला होता. मात्र, प्रशासना कडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्याय मिळत नाही या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आता आंबडेकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत गाव सोडले आहे. कमानीचे खांब पाडणाऱ्यांवर कारवाई न करण्यात आल्याने गावातील आंबेडकरी समाजातील जवळपास 125 कुटुंबातील 800 लोकांनी गाव सोडलं आहे.

मंत्रालयात जाऊन आम्ही सर्व न्याय मागणार.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचे खांब उभारण्याचे काम सुरु असताना अचानक ग्रामपंचायतीने विषारी मानसिकतेने कमानीचे खांब पाडल्याने कमान उभारणारा आंबडेकरी समाज आक्रमक झाला आणि कमानीचे खांब पाडणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांवर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील केली. मात्र, प्रशासनाने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बेडग गावातील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह आणि अंथरुण, पांघरुण, कपडे, भांडीकुंडी, जनावरे आदी संसारोपयोगी साहित्य घेत गाव सोडले आहे. जिल्हा प्रशासनाने कमानीचे खांब पाडलेल्यांवर कारवाई न केल्याने याच्या निषेधार्थ आणि न्याय मागणीसाठी आता हे सगळे आंबेडकरवादी पायी चालत मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आणि न्याय मागणार आहे, असं या मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या डॉ. महेशकुमार कांबळे यांनी सांगितले.
प्रशासना विरोधात राज्यात संताप… गावकऱ्यांनी गोव सोडल्याची माहिती समोर येताच आंबेडकरी समाजात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायत व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

