प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकरी संघर्ष मेळावा मेळावा व शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख हे राहणार आहे.
समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 12 सप्टेंबर मंगळवारला दुपारी 12.00 वाजता दिपाली मंगल कार्यालय, समुद्रपूर येथे शेतकरी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनंतर लगेच शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालय समुद्रपूर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस वाढत्या लागवड खर्च, महागडे बियाणे, खते, किटकनाशके निसर्गाचा असंतुलन यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आस्मानी संकटा सोबत सुलतानी संकटानेही शेतकऱ्यांना जेरीस धरले आहे. शेतकऱ्यांचा या संघर्षाला न्याय
मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष मेळाव्याचे आयोजन तसेच शासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मेळावा व मोर्चास उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी प्रमुख मागण्या: सन २०२३ ते २०२४ चे शेतमालाचे शासनाने जाहीर केलेले हमीभाव मागील वर्षाचे तुलनेमध्ये अत्यल्प आहे. सोयाबीनचे भाव ४३००-४६०० असुन व कापसाचे भाव ६६२० – ७०२० आहे. तरी या शेतमालाच्या भावामध्ये वाढ करण्यात यावी.
रानटी जनावरापासून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी. तसेच ताडोबा जंगलाला लागून असल्याने भागातील वन्य प्राण्याचा बंदोबस्त वन अधिकाऱ्यांनी तात्काळ करावा.
रानटी प्राण्यांचा घातक हल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितहानीची जबाबदारी शासनाने निश्चित करावी.
पूरपिडीत असलेल्या शेतकऱ्याचे पंचनामे काही प्रमाणात करण्यात आले व काही अजिबात करण्यात आले नाही ज्यांचे पंचनामे झाले आहेत. त्या शेतकरी बांधवाना शासनाची अजुनही मदत मिळाली नाही. ती मदत त्वरीत मिळावी व उर्वरीत शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे.
समुद्रपूर तालुक्यातील कृषिपंपासाठी दिवसा विज पुरवठा बंद राहते व रात्रीला सुरु असते त्यामुळे शेतकऱ्याला शेतमालाला माणी देता येत नाही. करीता लोडशेडींग बंद करण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पाणी पूरवठा सुरळीत करता येईल.
इतर मागण्या
समुद्रपूर तालुक्यात असलेले १५० पेक्षा जास्त खेडे गावे आहेत. समुद्रपूर ला लागूनच जाम चौरस्ता आहे इथुननॅशनल हायवे क्र. ४४ गेला असुन या हायवे ने जड वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. हा नॅशनल हायवे अपघातग्रस्त बनलेला असून या हायवेवर दर महिन्याला ८ ते १० अपघात निश्चित होत असतात. दवाखाना जवळ नसल्याने अनेक अपघातग्रस्त लोकांचा मृत्यु झालेला आहे. म्हणून समुद्रपूर येथे ग्रामिण रुग्णालयाला१00 बेड सह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा व तसेच आयसीयु, ट्रामा केयर सेंटर देण्यात यावा.
जाम चौरस्ता येथून नॅशनल हायवे नागपूर ते हैद्राबाद व तसेच चंद्रपूर ते नागपूर गेला असून अनेक शहराला/ गावाला जाण्याचा मार्ग हा जाम चौरस्ता सेंटर पॉइंट बनला आहे त्यामुळे तिथे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी. यासाठी जाम चौरस्ता येथे उड्डानपूलाची निर्मीती करण्यात यावी.
आयोजक महेश झोटींग तालुका अध्यक्ष, समुद्रपूर, अतुल वांदिले (प्रदेश सरचिटणीस), राजुभाऊ तिमांडे (माजी आमदार), सुधिर कोठारी (सभापती कृ.उ.बा.स. हिंगणघाट) हिम्मतसिंग चतुर (सभापती कृ.उ.बा.स. समुद्रपूर), अशोकजी वांदिले (संचालक कृ.उ.बा.स. समुद्रपूर), गजानन शेंडे (संचालककृ.उ.बा.स. समुद्रपूर), अनिकेत कांबळे, प्रलय तेलंग ( सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष), प्रशांत घवघवे (ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष), अशोक डगवार, दशरथ ठाकरे (जिल्हा सरचिटणीस), मंगेश गिरडे (उपसरपंच), सुभाषभाऊ चौधरी, सुरेंद्रजी कुकेकर (मा. जिल्हा प. सदस्य), विनोद कुटे, सचिन तुळणकर, सौ. योगिता तुळणकर (नगरअध्यक्ष), सौ.मायाताई जिवतोडे, सौ. संगिताताई रंगारी, राजुभाऊ कटारे, पिंटु उर्फ महादेव बादले, रविंद्र झाडे, मोहनरावजी महाकाळकर, शांतीलाल गांधी, मधुकर कामडी, सुधीर खडसे, राहुल लोहकरे, सौरभ साळवे (युवक प्रदेश कार्यकारी सदस्य), गणेश वैरागडे (संचालक कृ.उ.बा.स. समुद्रपूर), संजय तुराळे, अनिलभाऊ देशमुख, मोरेश्वर येंडे, अनिल आडकिने, दौलत येलगुडे, अमित अवचट, सुरेश भगत,राष्ट्रपाल कांबळे, लिलाधर बुटे, सोनु मेश्राम युवक जिल्हा उपाध्यक्ष

