रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन औरंगाबाद:- येथे मंत्रिमंडळ बैठकीत दि १६ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीवर हा भव्य मोर्चा काढण्यात आला.
आज राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. कुठे ओला दुष्काळ आहे तर कुठे पाऊस अभावी कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे राज्यात परत शेतकरी संकटात सापडला आहे. यांना लवकरात लवकर मदत नाही दिली तर राज्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीवर हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात हजारो महिला, पुरुष, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोर्चाला उपस्थित मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके अमित भाई भुईगळ औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष गुलाब बन अरुंधतीताई सिरसाठ जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ जालना पूर्व जिल्हा अध्यक्ष डेव्हीड घुमारे कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन जिल्हा महासचिव शफिक अत्तार जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बाबु गोसावी तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर तालुका उपाध्यक्ष सोयब पठाण तालुका महासचिव प्रकाश मस्के तालुका सचिव संदीप मोरे सर्व मराठवाड्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

