मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सिरोंचा तालुक्याला विभाजन करून झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे, झिंगानूर गावाला कोणत्याही प्रकारची नदीपूर व नाल्यांच्या पूर येणार नाही. झिंगानूर कोणत्याही प्रकारची धक्कादायक घटना घडणार नाही पाऊसाळात इतर कोणत्याही प्रकारची धक्कादायक बाब होणार नाही.
झिंगानूर या गावात 80% आदिवासी बांधवांच्या क्षेत्र आहे. हा झिंगानूर गाव चारही बाजूने सेंटर चौरस वर आहेत. कोणत्याही नद्या 15, किलोमीटर अंतरावर आहेत, इंद्रावती नदीच्या अंतर 15, किलोमीटर आहे. गोदावरी नदीचे अंतर 30, किलोमीटर वर आहेत, झिंगानूर गाव उच्च भागावरील आहेत. झिंगानूर गाव आदिवासी भागातील आदर्श म्हणून ओळखले जाते. आदिवासी क्षेत्रातील माडीया व गोंड समाजातील झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यासाठी मागणी अनेक वर्षे पासून मागणी आदिवासी बांधवाकडे लक्षवेधुन झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे 30, गावातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे,
सन 2000 पासून दरवर्षी अनेकदा शासन आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आली आहे परंतु आजही विभाजन कायमस्वरूपी करण्यात यावे झिंगानूर गाव तालुक्यातील उच्च ठिकाणी टेकडी जागेवर असल्याने कोणत्याही प्रकारची धक्कादायक बाब होणार नाही. तालुक्याच्या ठिकाणी रस्ते बंद होणार नाही अशी आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे,

