पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साळुंखे विहार सोसायटी येथे एक इसमाने माणुसकीला काळीमा फासत क्रूरता करून त्याने एका मुक्या प्राण्यांचा आपल्या चार चाकी गाडीने जीव घेतला. पाळीवर प्राण्यावर गाडी घालून क्रुरतेचा कळस समोर आल्याने त्या इसमावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शशी नारायण भूषण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, 5 ऑक्टोंबर रोजी रात्री 11.15 वाजताच्या सुमारास कोंढवा येथील साळुंखे विहार सोसायटी मध्ये असलेल्या शॉपिंग सेंटरच्या विरूध्द बाजूला पिंकी नावाची वय 9 वर्ष ही झोपलेली असताना सदर कुत्रीच्या अंगावरून काळ्या रंगाची महिंद्रा थेर क्रमांक एम. एच 12 यु एन 7611 वरील वाहन चालकाने गाडी अतिशय बेदरकारपने चालवून या कुत्रीला गंभीर जख्मी केले. त्यात तिच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून तिची निर्घृणपणे हत्या केली.त्यामुळे कोंढवा पोलिसांनी आरोपी गाडी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भादवी कलम 428, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, मोवाका कलम 184, प्राण्याना निर्दयपने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 1 (ए) व (i) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रूरता दिसल्यास रोखा ! पुणे शहरतील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला गुन्हा आणि या घटनेवरुन भविष्यात कुठेही प्राण्यांसोबत क्रूरता झाल्याचे लक्षात येताच आवाज उठवला पाहिजे. पाळीव कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून आरोपी याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र, यामुळे कुत्र्याचा नाहक जीव गेला.
पाळीव प्राण्यांसोबत क्रूरता केल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील समोर आल्या आहे. माकडावर डांबर ओतल्याची घटना, कुत्र्याला जाळल्याची घटना, कुत्र्यांच्या पिलांनाही त्रास दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी प्रयत्न व्हायला हावेत. प्राण्यांसोबत क्रूर व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई गरजेची असल्याचे अनेक प्राणी प्रेमींना यापूर्वी बोलून दाखवले आहे.जबाबदारी विसरता कामा नये!जगातील बहुतांश धर्मात प्राण्यांची हत्या करणे हे पाप मानले गेले आहे. तरीही काही लोक मोकाट जनावरांचा जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्राण्यांवरील क्रूरता त्यांची संवेदना दर्शवते. प्रत्यक्षात मानवामध्ये मानवतेचा ऱ्हास होत आहे. आता प्राण्यांवर होणारा हिंसाचार कसा थांबवायचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम सामान्य माणसाच्या मनात पशु-पक्ष्यांबद्दलची करुणेची भावना जागृत झाली पाहिजे. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई गरजेची आहे.

