✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- जिल्हात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे घडलेल्या मागील अनेक घटने वरून समोर येते. त्यामुळे पोलिसांनी चोरीच्या घटनेवर अंकुश लावावा अशी हाक जनतेमधून येत आहे. अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. घरातील बेडरूममधून 40 हजार रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ख्रिश्चन कॉलनी येथे शनिवारी दि.3 घडली आहे. याबाबत अश्विनी सुशिल अलसमराव वय 25, रा.खिश्चन कॉलनी, तारकपूर यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अश्विनी अलसमराव या मॅककेअर हॉस्पिटल येथे स्टार्फ नर्स म्हणून कामाला आहेत. त्यांनी दि.3 रोजी दुपारी 12 वाजता ड्युटीवर जाताना घरातील बेडरूममध्ये सर्व दागिने बॅगमध्ये ठेवले होते.
दरम्यान, रात्री 9 वाजता त्यांनी कामावरून परत आल्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता, त्यांना ते मिळून आले नाहीत. त्यानंतर याची विचारणा त्यांनी पती, सासू, सासरे यांच्याकडे केली असता, दागिने आम्ही घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरीला गेलेल्या दागिन्यामध्ये 30 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र, 400 रूपये किमतीचे जोडवे, 800 रूपये किमतीचे पैंजण, 9 हजार रूपये किमतीची अंगठी, असा चाळीस हजार 200 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.