नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी मोबाईल.न. 8369205752
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काल सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, या विधानानंतर त्यांना लाज वाटायला पाहिजे; खोटी माहिती पसरवतात, अशा पद्धतीचे विधान केलं. ज्या शासन निर्णयाचा ते उल्लेख करीत होते; तेव्हा ते स्वतः मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या सहकारी गटाचे ते नाव घेतात ते देखिल मंत्रिमंडळात होते. त्या जाहिरातीमध्ये क आणि ड गटांचा समावेश होता आणि त्या शासन निर्णयाची कधी अंमलबजावणीच झाली नाही.
आपण जी पदे काढण्याचा प्रयत्न केलात ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ती अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसुली खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांची कामे यांच्याशी त्यांचा संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकार देखिल असतात. ही पदे MPSC मार्फत भरली जातात. ती पदे आपण कंत्राटी पद्धतीवर देणार होतात. जळगावचे जिल्हाधिकारी यांनी तर जाहिरात देखील काढली होती. त्यांनी खुलेआम पत्रकारांना सांगितलं होतं की, मला वरून निरोप आला होता. पण तसा शासन निर्णय असल्यामुळे त्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार या पण पहिल्या शासन निर्णयामध्ये आपणही मंत्री म्हणून समाविष्ट होतात आणि दुसऱ्या शासन निर्णयामध्ये देखील मंत्री म्हणून आपण समाविष्ट होतात. MPSC ची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा गैरसमज नाही तर आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या एवढं वाईट वाटून घेऊ नका. लोक शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला फार हुशार समजत असलो तरी लोकांनाही खुप काही कळत असतं.
तुम्ही काढलेल्या त्या शासन निर्णयाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रचंड विरोध केल्यामुळे कुठल्याही एका पक्षाचे हे यश नाही तर महाराष्ट्रातील तरुणांचे हे यश आहे. या तरुणांनी उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं आणि कुठल्या प्रकारे आपण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात हे त्यांच्या लक्षात आलं.
शरद पवार व उद्धव ठाकरे ह्यांना लाज वाटली नाही का… हा मंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मंत्री होता आणि बाकीचे ८ जण हे सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण ह्यां मंत्रिमंडळात होते
शरद पवार व उद्ध्व ठाकरे यांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात ? असे म्हणून या सर्वांना करारा जवाब मिलेगा… असे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

