निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीत योजना अंतर्गत काम करीत असणाऱ्या मजुरांनी ग्राम रोजगार सेवक श्री आतिश बबनराव पिदूरकर यांच्या संकल्पनेतून लहान नाला येथे, निमनि कडून वाहत हिरापूर कडे जाणाऱ्या नाल्यावर सौ सुमित्रा उद्धव ढवस यांच्या शेताजवाड वनराई बंधारा बांधला या वेळी असंख्य मजुरांनी श्रमदान केले.
पुढील काळात गावात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाणी वाचवणे आणि त्याची साठणुक करून ठेवणे हे गरजेचं आहे. त्यामुळे वनराई बंधारा बांधला गेला. यावेळी कुकूडसाथ ग्राम पंचायतचे सरपंच श्री शंकर आत्राम यांनी (उत्तम कापूस उपक्रम अंबुजा फोन्डेशन) तर्फे मजुरांना अल्पपोहार दिला व स्वतः वनराई बंधारा कामात श्रमदान केले, यावेळी कोरपना तालुका येथील कृषिसाय्यक श्री धंनजय भगत उपस्थित होते.
हा वनराई बंधारा 100 सिमेंट चुंगड्याचा बांधण्यात आला असून बंधारा बांधल्याने सौ सुमित्रा ढवस यांच्या शेतीपासून वरच्या बाजूस ते श्री शंकर ठाकरे यांच्या शेती पर्यंत 150 मीटर लांब पाण्याची डाप पकडली असून यामुढे पाणी पातळी वाढली आहे.

