संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
गोंडपीपरी तालुक्यातील वटराणा गट ग्रामपंचायत मध्ये धामनपेट गाव येत असून ह्या गावची लोकसंख्या ३५० आहे. गोंडपीपरी पासून ३ किमी अंतरावर हे गाव आहे. इथं ग्रामीण रुग्णालये आहेत. या गावात अतिसाराची लागण झाली असून सुद्धा आरोग्य विभागाने कोणतीच दाखल न घेतल्याने या गावात आठ दिवसात आठ रुग्ण दगावले आहे. वीस रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी पण धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राने या गावाकडे पाठ फिरवल्याने येथिल नागरिक संतप्त झाले आहे.
गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांना माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता आमदारांनी जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांचेशी संपर्क करून त्या गावात आरोग्य कॅम्प लावण्याचे निर्देश दिले. घटनेची माहिती मिळताच स्वता धामणगाव गाठून तेथील नागरिकांची विचारपूस करून मृतकांच्या कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत, उपजिल्हाधिकारी कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्यकार्यपलन अधिकारी क्लोडे, सवर्ग विकास अधिकारी मुंडकर, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोद नागपुरे, उपसभापति अशोक रेचनकर फिरोज पठाण, देविदास सातपुते, संतोष बंडावार, अशोक रेचनकार, बालाजी चनकापुरे उपस्थित होते.
