जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तो पर्यंत संप मागे घेणार नाही असे पोस्ट खात्यातील संघटनेचे सचिव प्रणय देवावार यांनी पत्रकातून इशारा दिला.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आज दिनांक 12 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा विस्कळित झाली आहे. ग्रामीण डाक सेवक कर्मचा-यांना 8 तासांचा कामांचा मोबदला देण्यात यावा व नियमित कर्मचाऱ्यां प्रमाने सर्व लाभ देण्यात यावे डॉ. कमलेशचंद्र कमीटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी “विभागीय कर्मचा-शाप्रमाने ग्रज्युरीचे सूत्र लावून ग्रज्युटीमध्ये वाढ करणे. वैद्यकीय सेवा देण्यात यावी. सर्व प्रोत्साहन प्रणाली बंद करून सर्व कामे वर्कलोड मध्ये समाविष्ट करावे. नवनियुक्त GDS ला 80 च्या वर्कलोड नुसार लेवल – 2 ची वेतनश्रेणी देण्यात यावी.
या सर्व मागण्यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या बेमुदत संपामुळे टपाल विभागाच्या कल्याणकारी योजना जसे विविध IPPB, AEPS, G L पोलिसी असे विविध योजना व विशेष कडून PM किसान सन्मान निधी या सारख्या योजनेवर विशेष प्रभाव पडलेला आहे.
यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो…! जी.डी.एस. एकता झिंदाबाद… अशा घोषणेने परिसर दुमदुमला आहे. यावेळी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन AIGDSU कॉम प्रणय देवावार (संघटक सचीव), काँम बंडू भाऊ लिंगलवार, कॉम पृथ्वीराज कोलावार, गोसाई दुर्गे, तोगलिया गादस्वार, राजेश्वर बिपटल्लीवार ,इकबाल शेख, कुणाल मडावी, जनार्दन कोडापे, सुनील कोळपकवार, विशाल तुपकर, प्रकाश गोविंदवार, ज्योती बोडके, आरती आच्चेवार, यश भावसार, नयन राठोड, प्रायज्योत वाकडे, प्रशिष इंगळे, राहूल काशीद, कृष्णा गुज्जर, संदीप इडके, नागेश धोंडे, सेव्हाग डाकोरे, संजना गुंडावार इत्यादी.

