संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विभागातील चार दशकापूर्वी उद्योगाचा पाया उभा करणाऱ्या माणिकगड सिमेंट कंपनीने कुसुंबी स्थित गडचांदूर येथे सिमेंट उद्योग स्थापन केले 1981 च्या कालावधीमध्ये 643 हेक्टर भूपृष्ठ अधिकार देण्यात आले त्यापैकी 150 हेक्टर जमीन वनविभागाला परत करण्यात आली गेल्या पंधरा वर्षापासून 18 आदिवासी कुटुंबाचा न्याय हक्कासाठी लढा सुरू असून यापूर्वी अनेक वेळा सभा चर्चा झाल्या मात्र भूमापन मोजणीचा घोळ वन विभागाच्या जमीन ताबा प्रक्रिया यामध्ये झालेल्या चुकीमुळे 18 आदिवासी कुटुंबाचा जमीन अधिग्रहण किंवा कायदेशीर भूपृष्ठ अधिकार प्राप्त न करता टप्प्याटप्प्याने कंपनीने जमिनी उत्खनन करून त्या कोलाम आदिवासीना बेघर केल्याबाबत शासन प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहे.
मात्र अनेक वेळा विशेष चौकशी पथक नेमून या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच कंपनीला मंजूर क्षेत्रातील 493 हेक्टर पेक्षा अधिक उत्खनन झालेल्या जमिनीचे मोजमाप सीमांकन करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात आली कंपनीने वहीवाटीचा रस्ता शमशानभूमी यावर बेकायदेशीर अतिक्रमण केले कंपनीच्या अनाधिकृत कामाबाबत व अन्यायाबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहे.

