मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- जिल्हामध्ये आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाही. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
जमाव करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते, शहरातील शांतता भंग होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत या पंधरा दिवसांच्या कालावधीत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचा नियमाचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आदेशानुसार देण्यात आली आहे.