युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे क्रॉसिंग व चौकी जवळ रेल्वे पुलाचे केवायसी कंपनीचे काम चालू असताना येथील कंपनीच्या ट्रकने सोलर वाटर सप्लायरच्या खांबाला धडक लागल्याने तो खांब तुटला आहे. यामुळे येथील पाणीपुरवठा बंद झालेला आहे त्यामुळे येथील नागरिकांची गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची गैरसोय होत असल्याने गावातील सरपंच मंगेश गोतमारे यांनी येथील चौकशी करून येथील रोडवर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले जेव्हा पर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तेच पर्यंत मी आंदोलन चालूच ठेवणार असे सरपंच मंगेश गोतमारे यांनी सांगितले.
येथील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात यावा आणि पाणी पुरवठा चालू करण्यात यावा तसेच येथील रोडवर चिखल झाल्याने त्यांच्यावर गिट्टी मुरूम टाकून रोड वाहतुकीसाठी योग्य करण्यात यावा या रोडवर कधी कुणाच्या गाडीला धोका होईल हे सांगता येत नसल्याचे सरपंचांनी सांगितले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून येथील प्रश्न सोडण्यात यावा असे मागणी सरपंच यांनी केली त्याचप्रमाणे इतर मागण्या सरपंच यांनी व्यक्त केल्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन चालूच राहील असे गोतमारे यांनी सांगितले यावेळी गावातील नागरी प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी गावकऱ्यांच्या माध्यमातून या आंदोलनाला सुरुवात केली.
पाईपलाईन तुटल्याने नागरिकांना फार त्रास भोगाव लागत आहे येथील रेल्वेचे काम सुरू असल्याने या रोडवर अनेक ट्रक चालतात त्यामुळे या रोडवर फार मोठा चिखल झालेला आहे या चिखलामुळे कधी कोणाची गाडी असेल या कोणते नुकसान होईल हे सांगता येत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून येथील नागरिकांचा प्रश्न सोडण्यात यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इसारा सरपंच मंगेश गोतमारे यांनी व गावकऱ्याचा दिला आहे.