Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महात्मा फुले यांचे स्त्रीउत्थानांचे कार्य..! विशेष लेख

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 11, 2024
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, साहित्य /कविता, हिंगणघाट
0 0
0
महात्मा फुले यांचे स्त्रीउत्थानांचे कार्य..! विशेष लेख
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रा. अस्मिता भगत, आंबेडकरी लेखिका, रा. हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- महात्मा फुले हे एका विचार युगाचे नाव आहे. भारतातील परंपरागत समाज संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होत. त्यांची विचारसरणी सत्याच्या आधारावर अधिष्ठित होती. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे दारे मोकळे करून दिले. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा विरुद्ध ज्योतिबा फुले व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जातिभेदाच्या व धर्म रूढीच्या बेड्या तोडून स्त्रियांवर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी हाल अपेष्ठा सहन करीत अपमानांची पर्वा न करता सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य चंदनासारखी भिजवले व समस्त स्त्रियांना शिक्षण दिले.

हजारो वर्ष अडकून पडलेल्या स्त्रींची अवस्था दयनीय होती व आजही अनेक स्त्रियांची अवस्था दयनीय स्थितीची आहे, पुरुषी व्यवस्थेच्या शोषणाला झुंजारून देण्यासाठी स्त्रीवादी चळवळ उभी राहिलेली आहे. स्त्रीवाद म्हणजे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मिळते, तेव्हा उत्तर हेच येते की, स्त्रीला व्यक्ती सारखे जगू द्या,तिच्याकडे सन्मानाने बघा, तिलाही भावना, मन आहे, ती हाडमासांची व्यक्ती आहे. तिलाही कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अधिकार आहेत. हे मान्य करणे म्हणजे स्त्रीवाद होय.

आजची भारतीय स्त्रीवादी चळवळ पाश्चात्य स्त्री वादामुळे प्रभावित झाली असली तरी तिचा उगम वास्तविक 19 व्या शतकात सुरू झालेल्या समाजसुधारकांच्या समाजसुधारणा चळवळीतून झालेली आहे. महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाचे कार्य करून स्त्रीपुरुष समानता प्रस्थापित केली.1848 ला मुलींची पहिली शाळा काढली व या पद्धतीने शिक्षण समाजातील सर्व तळागाळातील समाजापर्यंत ते गेले पाहिजे यासाठी त्यांनी हंटर आयोगकडे मागणी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले नाही तर स्त्रियांच्या पुनरुत्थानासाठी अमूल्य कार्य केलेले आहे.

तत्कालीन काळामध्ये ब्राह्मण समाजामध्ये विधवा महिलावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार व त्यांच्यावर जबरदस्तीने वैधव्य लादले जात, तसेच स्त्रियांना विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जात असे केशवपणाची प्रथा तत्कालीन समाजामध्ये प्रचलित होती,स्त्रियांच्या सन्मानासाठी महात्मा फुले यांनी न्हाव्याचा संप करून केशव पण प्रथेविरुद्ध आवाज उठविला आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. तत्कालीन समाजामध्ये बालविवाहाची आणि जठर विवाहाची प्रथा प्रचलित होती आणि पुनर्विवाहाला समाजामध्ये मान्यता नव्हती. पुण्यामध्ये ब्राह्मणाचे वर्चस्व असल्यामुळे ब्राह्मण समाजातील तरुण विधवांना हरिदास, किंवा कोणीतरी जवळच्या नातेवाईकाच्या वासनाला बळी पडावे लागत त्यामुळे त्या गरोदर राहत आणि समाजात होणाऱ्या बदनामीमुळे त्या जन्माला आलेल्या बाळाला फेकून देत अथवा गर्भपात करून घेत. अशा बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महात्मा फुले यांनी 1863 ला बाल हत्या प्रतिबंधक गृह आपल्याच घरी स्वतःच्या खर्चाने सुरू केले आणि भारतातले पहिले बालहत्या प्रतिबंधगृह म्हणून ओळखले जाते.एवढेच नव्हे तर काशीबाई या ब्राह्मण विधवा स्त्रीच्या मुलाला यशवंत यास दत्तक घेऊन त्याला स्वतःचे नाव दिले व सन्मान दिला. अनाथ आश्रम, बालिकाश्रम चालविणे आणि सोबतच अस्पृश्यांसाठी स्वतःच्या मालकीचा पाण्याचा हौद खुला करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होत.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील जातीभेद व विषमतेला चातुॆवर्णव्यव्यवस्थेला विरोध करून समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन 24 सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजामध्ये स्त्री पुरुष दोघांनाही समान दर्जा दिला. स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांना दिले त्यांच्यासोबत एकोणवीस स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले.
सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाच्या प्रमाण ग्रंथाचे लेखन स्वतः करून आदर्श सत्यशोधक समाज आणि व्यक्ती कसा असावा हे सांगितले, या सत्यशोधक समाजातून अनेक सत्यशोधक कार्यकर्ते घडविले, ज्यामध्ये स्त्री पुरुष या दोघांचे समावेश असून सत्यशोधक समाजाचे कार्य अविरत चालण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार समाजामध्ये पोहोचविणे गरजेचे आहे, त्यांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत व समाजातील युवकापर्यंत पोहोचवणे आज काळाची गरज आहे.

क्रांतीसुर्य क्रांतीबा महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन…🙏🙏

Tags: प्रा. अस्मिता भगतमहात्मा फुले
Previous Post

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेचे पत्रकाराबदल आक्षेपार्ह वक्तव्य, पोलिस निरीक्षक वृष्टी जैन यांना केली कारवाईची मागणी.

Next Post

ठाण्यात: अघोरी कृत्यासाठी आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा दिला नरबळी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाण्यात: अघोरी कृत्यासाठी आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा दिला नरबळी.

ठाण्यात: अघोरी कृत्यासाठी आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा दिला नरबळी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In