✒️राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर:- आष्टी-आलापल्ली महामार्गावर कंचनपूरचे असलेले सूभाष जयदार यांची पत्नी बीजोली वय 45 वर्ष यांची सूरजागडवरून लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेचा निषेधार्थ समस्त बंगाली बांधव एकत्र येऊन 8 गाड्यांना आग लावून जाळपोळ केली. हंसराज अहिर त्या कूटूंबाचे भेट घेवून सांत्वन केले. जनतेच्या सोयीसाठी जडवाहतूक काही प्रमाणात कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलीस कारवाईची माहीती घेतली.
यावेळी यांचासोबत माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, भाजपाचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे, सुहास माडूरवार, साईनाथ मास्टे, गणेश डहाडे, गणपती चौधरी आदि उपस्थित होते.