सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येते वीज महावितरण अधिकारी आणि कर्मचारी तर दुसरीकडे पोलिस विभाग समोरा समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपुरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा आणि गृह या दोन्ही महत्त्वाची खाती असल्याने चंद्रपुरात नेमकं सुरू आहे तरी काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऊर्जा आणि गृह ही दोन्ही विभाग जनतेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण ऊर्जा विभाग प्रत्येक घरी वीज पुरवठा करतो आणि गृह विभाग म्हणजेच पोलिस जनतेची सुरक्षा करते. पण जनतेच्या सेवेसाठी असलेली दोन्ही खाती एकमेकांच्या विरोधात ठाकली तर? कधी विचार केला नसेल असं भांडणं या दोन्ही खात्यांमध्ये झाले.
चंद्रपुरात पोलिस विभागाकडे वीज महावितरणचे 139 वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. या वीज कनेक्शनचे कोट्यवधीचे वीज बिल थकीत आहे. मार्च अंडींग असल्याने हे थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने पोलिस विभागा कडे रेटा लावला होता. मात्र बिल भरले न गेल्याने अखेर शहराच्या गिरनार चौकातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे कनेक्शन वीज महावितरणने कापले आणि यावरूनच पोलिस आणि वीज महावितरण विभागातील भांडणाला सुरुवात झाली. अगदी पोलिसांनी सूड उगवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठा फौज फाट्यासह वीज महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले. आणि बाहेर निघणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या- वाहने चलान केली.
यावर पोलीसांचे काय म्हणणे? पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केल्याने वीज महावितरण अधिकारी आणि कर्मचारी भांबावलेले आणि भेदरलेले दिसून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारा बाहेर एकच गर्दी केली. थकीत बिलापोटी पोलीस विभागवार कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीने पोलीस विभाग सूड घेत असेल तर कायदा कुठे आहे? असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला तर दुसरीकडे या सर्व अफवा असून अशा पद्धतीच्या मोहिमा आम्ही अनेक विभागात नेहमी राबवितो असा पवित्रा पोलीस विभागाने घेतला आहे.
सुडाची भूमिका आणि प्रश्न निर्माण? पोलिसांनी एखाद्या सुडाची भूमिका घेतल्यानंतर घाबरलेल्या महावितरणने कापलेले एकमेव कनेक्शन पुन्हा जोडून दिले यात थकीत बिल भरलेच गेलेले नाही हे विशेष. आता वीज कनेक्शन कापण्याच्या दिवशीच पोलिसांनी महावितरणच्या कार्यालयापुढे चलान मोहीम का राबवली यातच सर्व आले. दोन्ही विभाग अत्यावश्यक सेवा गटात मोडतात. थकीत वीज बिल असताना अशा पद्धतीने सुडाची कारवाई करण्याइतपत मग्रुरी पोलिसांमध्ये येतेच कुठून असाही प्रश्न विचारला जात आहे.
