आमदार जयंतराव पाटील यांनी ग्राम साधन व्यक्तीची मुद्दा मांडताना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ३४जिल्यात ३४००ग्राम साधन व्यक्ती कार्यरत आहेत, मात्र या ग्राम साधन व्यक्तींना अंकेक्षण प्रक्रियेचे (सोशल एडिट) काम एका वर्षातून केवळ एक ते दोन महिन्याचे काम मिळत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी निवड केलेल्या ग्राम साधन व्यक्तींना वर्षभर नियमित काम मिळावे, लढा उभारला आहे. दरम्यान ग्राम साधन व्यक्तीच्या अर्थसंकल्पीय मंत्री माजी आमदार जयंतराव पाटील यांनी मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
ग्राम साधन व्यक्तींचे प्रत्येक जिल्ह्यातून आमदार खासदारांना नियमित काम मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन अधिवेशनात ग्राम साधन व्यक्तींचा आवाज मंत्रिमंडळात पोहचवून नियमित काम मिळवून देण्याचा मागण्या मान्य करण्यात यावे.अशी अपेक्षा करण्यात आले होते.कोणीही सामाजिक अंकेक्षण प्रकिया ग्राम साधन व्यक्तींचे मुद्देअधिवेशनात उपस्थित केलेले नाही . सामाजिक अंकेक्षण करणाऱ्या ग्राम साधन व्यक्तींचा मुद्दा अधिवेशनामध्ये कोण उचलून धरणार अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते, त्या मुळे सांगली जिल्यातील आ.जयंतराव पाटील यांनी ग्राम साधन व्यक्तीचे अधिवेशनात उचलून धरून गाजवणात आले आहे.या मुद्द्यावर शासनानी काय भूमिका घेतील या कडे महाराष्ट्र राज्यातील एकूण ३४हजार ग्राम साधन व्यक्तीचे पोटा पाण्याच्या प्रश्न निर्माण झाले आहे.हाताला काम मिळवून देण्याची मागणी जोर धरीत आहेत.

