Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटें यांची निवड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 24, 2025
in आरोग्य, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी  डॉ. ओमप्रकाश शेटें यांची निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा गोरगरिबांचे देवदूत म्हणून परिचित असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांना पदोन्नती मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड व कार्यकक्षा याबाबत सरकारच्या वतीने शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. सरकारकडून झालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाचे व परिश्रमाचे मूल्य अधोरेखित करणारा आहे. डॉ. शेटे यांच्याकडे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण जबाबदारी आल्यामुळे सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून डॉ.ओमप्रकाश शेटे सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना डॉ. शेटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून केलेले काम उल्लेखनीयच नाही तर ऐतिहासिक आहे. तत्कालीन सरकारमध्ये फडणवीस यांचा ‘सातवा माळा’ गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य मंदिर बनला होता. त्या मंदिरातील पुजारी म्हणून शेटे यांनी केलेली रुग्ण सेवा अभूतपूर्व होती, याला महाराष्ट्र साक्षी आहे. त्यावेळी लाखो लोकांना योजनेचा लाभ देत मुख्यमंत्री सहायता निधीतून ६०० कोटी व धर्मादाय कोट्यातून एक हजार दोनशे कोटींचे उपचार करण्याचा विक्रम करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळा मध्ये गरीब रुग्णांना उपचारासाठी मदत मिळणे दुरापास्त झाले होते.

राज्यामध्ये परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास विश्वासू शिलेदारांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने फडणवीस यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रिकरण करुन पाच लाख रुपयांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्यावर सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना म्हणून परिचित असलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

डॉ.ओमप्रकाश शेटे सक्षम पर्याय: विधान परिषदेच्या सभागृहात अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी लक्षवेधी लावत आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना यातील त्रुटीवर प्रचंड टीका केली होती. या योजनेतील त्रुटीमुळे सामान्य माणसांना पाच लाख रुपयाचा लाभ मिळत नाही असा आरोप सर्वांनी केला होता. कदाचित या योजनेला शेवटच्या घटकापर्यंत देण्याकरिता व झारीतले शुक्राचार्य बाजूला करण्याकरिता डॉ.ओमप्रकाश शेटे सारखा अनुभवी व सक्षम पर्याय म्हणून फडणवीस यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याचे समजते.

रुग्ण व रुग्णालये दोन्ही वाचली पाहिजेत: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अशी एकत्रित असलेल्या आयुष्मान योजनेमध्ये राज्यातील 1800 पेक्षा जास्त रुग्णालये अंगीकृत आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या हॉस्पिटलवर चाप बसण्याची गरज आहे. रुग्ण आणि रुग्णालये दोन्ही वाचली पाहिजेत यासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे कसा सुवर्णमध्य साधतात? हे पहावे लागेल. जबाबदारी सोबतच मिळालेल्या अधिकारांचा वापर करून डॉ. शेटे हे सामान्य रुग्ण व रुग्णालये या दोघांमध्ये योग्य समन्वय साधतील यात शंका नाही. यासाठी यापूर्वीचा दांडगा अनुभव त्यांच्या कामी येईल

Previous Post

मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात जल दिनानिमित कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

दशकभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेतील कळमेश्वर येथील निकोसे प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतला तक्रारीचा आढावा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दशकभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेतील कळमेश्वर येथील निकोसे प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतला तक्रारीचा आढावा.

दशकभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेतील कळमेश्वर येथील निकोसे प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतला तक्रारीचा आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In