प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज खरांगणा, ता. आर्वी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली. ही तिरंगा यात्रा हे एक अपूर्व देशप्रेमाचे पर्व ठरले. भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जयघोष आज प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर विजय उत्सवाच्या रूपात उमटलेला पाहून मन अभिमानाने भरून आले.भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणेने संपूर्ण खरांगणा देशभक्तीच्या वातावरणाने नाऊन निघाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केलं “हम ना झुकेंगे, और ना रुकेंगे!” हे केवळ सैन्याचं नव्हे, तर प्रत्येक देशवासियाचं ब्रीदवाक्य आहे. या स्फूर्तिदायी यात्रेतील सहभाग, राष्ट्रभक्तीचा उत्सव आणि आपली एकजूट हेच आपले खरे सामर्थ्य आहे. या प्रेरणादायी उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे उपस्थित होते.

