Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home बीड

पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2025
in बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री धनजंय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक समतेच्या विषयावर आपले परखड मत मांडले आहे. प्रत्येकाने महामानवांचे विचार गाठीशी बांधून ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थितांना संबोधन करताना धनजंय मुंडे म्हणाले की, समाजात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवला. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. आज आपण प्रत्येकाने आपआपलेच महामानव बांधून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

राज्याचे माजी मंत्री मुंडेंनी पुढे महामानवांचे कार्य अधोरेखित करत उपस्थितांना समतेची कास धरण्याचे आवाहन केले आहे. ‘मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो इथे उपस्थित आणि व्यासपीठावरील सर्वांना एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य फक्त मराठा समाजासाठी उभे केले नव्हते तर ते अठरा पगड समजासाठी उभे केले होते. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिले हे संविधान फक्त मागास प्रवर्गातील लोकांसाठी निर्माण नाही केले. साहित्यातून उपाशी माणसांची व्यथा खऱ्या अर्थाने कुणी मांडली, लिहिली तो माणूस म्हणजे अण्णा भाऊ साठे. महात्मा फुले यांनी देश स्वातंत्र्य होण्याअगोदर शिक्षणाची चळवळ निर्माण केली ती फत माळी समाजासाठी नाही केली. भगवान बाबांनी अध्यात्मतून आणि शिक्षणातून सांगड घातली ती फक्त वंजारी समाजासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराज पासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्वच महापुरुषांचे कार्य आणि शिकवण ही सर्वसमावेशक राहिलेले आहे,’ असे त्यांनी अधोरेखित केले.


मुंडेनी असेही आवाहन केले की, महामानवांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे. पुढे ते म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही. मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा? असा सवाल देखील यावेळी धनजंय मुंडे यांनी उपस्थित केला. तर ‘बीडमध्ये ही प्रथाच पडली आहे, अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली. यासाठी सर्वांनीच आणि सर्व समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे. आपण ज्या मागण्या याठिकाणी केल्यात इथून पुढची सर्व जबाबदारी माझी आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Tags: BeedDhanajay mundeपोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल
Previous Post

हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन व नगर परिषदच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Next Post

सामाजिक कार्यकर्ते अभिजित धोटे यांची सास्ती दौऱ्यात युवकांशी संवाद व शोकसंवेदना व्यक्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सामाजिक कार्यकर्ते अभिजित धोटे यांची सास्ती दौऱ्यात युवकांशी संवाद व शोकसंवेदना व्यक्त.

सामाजिक कार्यकर्ते अभिजित धोटे यांची सास्ती दौऱ्यात युवकांशी संवाद व शोकसंवेदना व्यक्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In