मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली:-* तालुक्यातील दिंडवी गावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिभा फुले समिती तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, अध्यक्ष स्थानी दिलीप कोटरंगे युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,सत्य बळीराज निकाडे,आबाजी जेंगठे, शामलाताई मडावी,विकास आतला, प्रशांत आत्राम,योगेश कुमरे,दयाराम उसेंडी,महाजन उसेंडी,सुरेश उसेंडी,देविदास मोहूर्ले, कोशिक आवडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दिंडवी गावात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी त्यावेळी परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या शोषण विरुद्ध व त्यांना समान संधी, अधिकार मिळवून देण्यासाठी प्रस्थापित जात्यांध शक्तीचा विरोध पत्करून शिक्षणाची संधी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले या आधुनिक भारताच्या भाग्यविधात्या आहेत.त्यांनी स्त्री शिक्षणाचा जागर संपूर्ण स्त्रीवर्गाला दिला.स्त्री शिक्षण, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवत समाजपरिवर्तनाचा मार्ग त्यांनी दाखवून दिला. त्यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव दिशादर्शक ठरत राहतील असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
दिंडवी येथील महात्मा फुले समिती द्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सर्वप्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व महापुरुषांचे पूजन केले. ते पुढे म्हणाले की, त्याकाळात मुलींना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती.अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून स्त्रीयांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांना जोडलं.पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलांची पहिली शाळा सुरू केली.त्यानंतर चार वर्षातच एकोणविस शाळा सुरू करून भारताच्या प्रथम मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी प्राप्त केला.१८५२ मध्ये उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून सन्मान ही करण्यात केला.एवढा उत्तुंग कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन समाज पुढे करण्यास पुढाकार घ्यावा असे राजे अम्ब्रिशराव आत्राम बोलले.

