युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- जिल्हातील काटोल येथील तहसील कार्यालय समोर बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेतर्फे देशातील जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात भव्य धरणे आंदोलन नुकतेच करण्यात आले आणि नायब तहसीदार जवंजाळ यांचे मार्फत शासनांस न्याय मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळ तर्फे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे तर मार्गदर्शन व संचालन संघटनेचे राष्ट्रीय महासचिव महेंद्र सातपुते यांनी केले यावेळी क्रांती मीनल, संगीत बाबू इंगळे, पंकज गायकवाड, विजय घाटोळ, संजय चौधरी विदर्भवादी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्याय मागणीचे निवेदनात वेगळा विदर्भ राज्य निर्माण करणे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, राजस्थान येथील इंद्रकुमार मेघवाल विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा झालेल्या पिकाची नुकसान भरपाई हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यात औद्योगिक कामगारांना नियमानुसार वेतन व इतर सोयी सुविधा नियमित न देणाऱ्या कारखानदारावर सहा महिन्याची तुरुंगवास शिक्षेची तरतूद कामगार कायद्यात करण्यात यावी.
काटोल तालुक्यातील कोंढाळी गावातील शासकीय दुकान गाडे मध्ये सुरू असलेले देशी दारूचे दुकान त्वरित बंद करण्यात यावे, देशात सार्वत्रिक निवडणूक हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, राज्यात विजेवरील वीजदर कमी करण्यात यावे, सरकारने कलावंतांना पाच लाख वार्षिक मानधन म्हणून देण्यात यावे, राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद करण्यात यावे, इत्यादी मागण्या चे लेखी निवेदन शिष्टमंडळ द्वारे देण्यात आले.
यावेळी शासनाचे जनतेविरोधी धोरणाविरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवला व घोषणा देण्यात आल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे यांनी आंदोलन स्थळी भाषणात म्हणाले की देशात सरकार अमृत महोत्सव साजरा करीत असून देशात अजूनही जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत जनतेच्या समस्या प्रश्न अजूनही तसेच कायम आहे देशात भ्रष्टाचार महागाई वाढली असून सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे जनतेच्या रास्त मागण्या घेऊन धरणेआंदोलन करण्यात आले आहे सरकारने या मागण्या तीस दिवसाच्या आत मान्य केल्या नाही तर पुढे धडक तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता प्रेम कुमार सोमकुवर, बाबाराव वाघमारे, मंगला दुर्गे, बाबाराव कडू, अर्णव गायकवाड, लक्ष्मी शेंडे, भगवान गायकवाड, राजीव बांगर, आशा मेंढे, जीवन बागडे, रामदास हिवराळे, लता जाधव, प्रवीण वानखेडे, बंडूभाऊ शेंडे, हेमराज ढवळे आदींनी परिश्रम घेतले आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते