मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
मुलचेरा आज आनंद, उत्साह व मंगलमय वातावरणात बहुभात (स्वागत) समारंभ मोठ्या थाटात माठात कार्यक्रम पार पडला. या समारंभाचे औचित्य साधून **श्री. बादल सेठ**यांचे चिरंजीव बलराम शहा व भगनगर येथील निखिल इज्जतदार यांची कन्या राखी यांच्या विवाहानंतरचा बहुभात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंगलप्रसंगी शाहीन ताई यांनी विशेष उपस्थिती लावून नवविवाहित वर–वधूस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याने परस्पर सन्मान, विश्वास आणि समजूतदारपणाच्या बळावर आपले वैवाहिक जीवन यशस्वीपणे घडवावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच शाहीन भाभी हकीम व बबलू भैया हकीम यांनी समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्यास प्रेमपूर्वक भेटवस्तू प्रदान केल्या. त्यांनी वर–वधूच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी वातावरण अधिक भावनिक व आनंदी झाले.
या स्वागत समारंभास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, प्रा. सर्फराज आलम, तसेच प्राचार्य डॉ. रणजित मंडल सर यांचा विशेष सहभाग होता. उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी आणि सुखी संसारासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
संपूर्ण कार्यक्रम पारंपरिक रितीरिवाज, आपुलकी, स्नेह व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. बहुभात समारंभानिमित्त उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी एकमेकांशी संवाद साधत आनंद साजरा केला. नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केला.
हा बहुभात स्वागत समारंभ मुलचेरा तालुक्यात एक संस्मरणीय आणि आनंददायी सामाजिक कार्यक्रम म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

