Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात समोर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 9, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात समोर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिकः- संपूर्ण राज्यातील लोकांचे मन हेलावणारी लक्झरी बसच्या अपघाताची घटना नाशिक मध्ये घडली.वेळ सकाळी 11 वाजताची… कुठे नातेवाइकांचा आक्रोश… तर कुठे यंत्रणांकडून मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशात काही व्यक्ती येऊन उपस्थित पोलिसांना धीरगंभीर आवाजात साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, असे आर्जव करतात. मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाबाहेर शनिवारी दि.8 उपस्थितांनी अनुभवली अन् नकळत त्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाका येथे हॉटेल मिरचीसमोर पहाटे लक्झरी बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या 12 प्रवाशांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची बातमी वार्‍यासारखी पसरल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालय गाठले. अपघातात बसमधील मृत प्रवाशांच्या शरीराचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले. त्यामुळे शवविच्छेदन कक्षाबाहेरच पोलिसांनी मदत कक्ष स्थापन केला. या कक्षात आलेल्या नातेवाइकांकडून मृतांची सविस्तर माहिती घेत जागेवरच अहवाल तयार करून बॉडी हस्तांतरित करण्यात येत होती. सकाळी 11 पासून सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, रुग्णालयातील गोंधळामुळे योग्य ती माहिती उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांनी थेट शवविच्छेदन विभाग गाठला. तेथे मयतांच्या यादीत आपल्या व्यक्तीचे नाव आहे का याची खातरजमा ते करत होते. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण यादी तपासल्यानंतर त्यात नसल्याचे सांगताच उपस्थितांमधील काही नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर यादीत नाव असणार्‍यांना पोलिसांकडून शवविच्छेदन कक्षात जाऊन ओळख पटविण्यास सांगण्यात येत होतेे. यावेळी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला जात होता.

प्रशासनाकडून मदत कक्ष :

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या कक्षातून अपघातामधील जखमी तसेच मृतांबद्दलची माहिती देण्यात येत होती. तसेच संपर्कासाठी 0253- 2572038 व 0253-2576106 हे हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले असून, या कक्षात जिल्हा रुग्णालयाचे मनोज जगताप आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही.आर. महाले हे नातेवाइकांना माहिती देत होते.

अन् नातलगांच्या जीवाची घालमेल :

अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या यवतमाळ येथील कार्यालयाशी संपर्क साधत प्रवाशांची नावे आणि माहिती जाणून घेतली. परंतु, बसचालकांने वाटेत काही प्रवासी बसमध्ये बसवल्याने संबंधित प्रवाशांची माहिती स्थानिक यंत्रणेला तातडीने उपलब्ध झाली नाही. त्यामुळे ओळख लागेपर्यंत उपस्थित नातेवाइकांच्या जीवाची घालमेल सुरू होती.

Previous Post

नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..

Next Post

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची भूमिका मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर केली टीका.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची भूमिका मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर केली टीका.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची भूमिका मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर केली टीका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In