अळ्या युक्त जेवण केल्याने 13 विद्यार्थांना उलट्या
✒️प्रशांत जगताप, संपादक
वर्धा:- महात्मा गांधी विश्व हिंदी महाविद्यालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या जेवणात मोठ्या प्रमाणात अळ्या मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महात्मा गांधी विश्व हिंदी महाविद्यालय प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आहारात अळ्या आढळून आल्याच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गोंधळ घालून प्रशासनाला जाब विचारला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील अनेक दिवसा वर्धा येथील महात्मा गांधी विश्व हिंदी महाविद्यालय शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या जेवणात महाविद्यालय प्रशासनाकडून हलगर्जी करण्यात येत होती, आता तर त्याच्या जेवणातून अळ्या सापडल्या. हे अळ्या युक्त जेवण केल्याने 13 विद्यार्थांना उलट्या होणे सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संतप झाले आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात रात्री 9 वाजेपासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आंदोलने केली. महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारत सर्वांना धारेवर धरले आहे.
विद्यार्थ्यांकडून प्राप्त माहिती नुसार, वर्धा येथील महात्मा गांधी विश्व हिंदी महाविद्यालय मधील वसतिगृहात सुमारे देशातील विविध भागातील 200 विद्यार्थी राहतात. त्यांना मागील अनेक दिवसापासून आम्हाला खराब प्रकारचं जेवण दिल्या जात आहे. त्यात आता तर जेवणात अळ्या दिसून आल्या आहे. हे खराब जेवण खाल्यामुळे 13 विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या आहे. त्यामुळे आमच्या जीवाशी महाविद्यालयात खेळ सुरू आहे.
विद्यार्थ्याचा जीवाशी कोण खेळत आहे?
महात्मा गांधी विश्व हिंदी महाविद्यालय हे भारतातील प्रसिद्ध महाविद्यालय असून येथे देश विदेशातून विद्यार्थी शिकायला येतात. पण सध्या हे विद्यार्थ्यांना अळ्यायुक्त जेवणाच्या कारणाने गाजत आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवाशी खेळत आहे तरी कोन? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला अशी विचारणा केली जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348