आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- शहराचा मध्य भाग असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याच दिसून येत आहे. डॉ. आंबेडकर चौकाचा सहभोवताल मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे या चौकाचे प्रावित धोक्यात आले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर यांच्या आमदार निधीतून आणि हिंगणघाट नगर पालिकेचे सहकार्यातून लाखो रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. पण आज या चौकाच्या सभोवती ऑटो रिक्षा, कापड दुकान आणि फेरीवाल्यांचा अक्षरशः विळखा पडला आहे. त्यामुळे हिंगणघाट नगर पालिका प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. येथील सर्व हॉटेल्स व दुकानदारांनी जणू एकमेकांच्या ईर्षेने रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली आहेत अस चित्र तरी सध्या दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा हिंगणघाट शहरातील एक मुख्य मार्ग आहे. त्या मार्गावर बाजार, दवाखाने, बस स्टॉप, शाळा कॉलेज, आणि शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे या चौकातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पण आज या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वाट काढन पण दुरापत झाल आहे. या चौकात कोणत्याही क्षणी भीषण अपघाताची शक्यता नाकारू शकत नाही.
नगर पालिका झोपेत…
नगर पालिका द्वारा या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. पण या चौकाच्या देखरेखे बाबत नगर पालिका उदासीन धोरण अवलंबिले असल्यामुळे हा चौक पूर्णत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या आहे. या चौकात अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येत असते. पण आज हा चौक नगर पालिकेच्या निष्काळजी पणामुळे आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या आहे.
सामाजिक कार्यकर्ते करणार आंदोलन.
नगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर हे अतिक्रमण काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अतिक्रमण मुक्त करावा. नाही तर काही दिवसात या विरोधात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज वासेकर यांच्याकडून देण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348