महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यात गावात बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलामुळे अनेक नागरिक भयाखली जीवन जगत आहे. मागील काही दिवसांपासून भक्षाच्या शोधात फिरणार्या बिबट्याने धुमाकूळ घालत 2 शेळ्या व 2 बोकड फस्त केले. ही घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली आसुन गावातील भाऊसाहेब मार्तंड खतोडे यांच्या सर्वे नंबर 62 मधील घराजवळ गोठ्यात रात्री बिबट्याने धुमाकूळ घालत 2 शेळ्या व 2 बोकड फस्त केले आहे.
वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती जे. ए. पवळे, वॉचमन गोरडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. राजापूर मध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आढळत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी भयभीत झाले आसुन या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी संगमनेर साखर कारखाना व्हा. चेअरमन संतोष हासे, सरपंच शैला हासे, उपसरपंच बादशहा हासे, पो. पा. गोकुळ खतोडे, भारत शेलकर, भानुदास सोनवणे, बाळासाहेब शिरोळे, पंढरीनाथ हासे, भाऊसाहेब हासे, रावसाहेब खतोडे, शांताराम खतोडे, रामनाथ खतोडे, सुदाम हसे, संदीप हसे, कैलास खतोडे, सत्यम खतोडे यांच्यासह शेतकर्यांनी देखील केली आहे.

