वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
पुणे:- येथील मोरूची येथे कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
बौद्ध धर्मात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारीपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मिय स्त्रि- पुरुष आठ शिलांचे पालन व उपोसथ व्रत करतात, सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा ही बौध्द धर्मीय लोकांची महत्वाची पौर्णिमा पैकी एक आहे.
यामुळे कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून मोरूची गावात अनेक उपासक -उपासिकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्तिकी पौर्णिमा साजरी करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले या कार्यक्रमाचा मुख्य विषय धम्म आपल्या दारी व बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महानंदा डाळींबे यांनी यांनी सादर केलेल्या सावित्रीबाई फुले यांची एकांकिका नाटक हे होत. त्यास उपस्थित असलेल्या उपासक-उपासिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात भंते उपाली (बौद्ध धम्म इतिहास अभ्यासक) यांची धम्मदेसना झाली. तर सुधाकर नगरे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा व धम्म जागृती ग्रूप, छाया मोरे, बाळासाहेब गायकवाड (बौद्धाचार्य) उषा बाई लोंढे, रतन लोंढे,
जया झेंडे, अंगणवाडी सेविका, साधना गायकवाड, माधूरी कांबळे, तानाजी साळवे, माया सरतापे सह अनेक महिला आणि पुरुषांनी विशेष सहकार्य केले.