मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने आज मोठ्या प्रमाणावर महिला दागिने घालायला घाबरत असल्याचे समोर येत आहेत. एक अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिक महामार्गावरील बळी मंदिराजवळ ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना भरदिवसा घडली आहे.
मालती यशवंत चव्हाण रा. मित्र विहार कॉलनी, बिडी कामगार नगर, नाशिक यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या शनिवारी ता. १९ दुपारी तीन वाजेच्या सुमारास बसमधून बळी मंदिर बस थांबा येथे उतरल्या होत्या. त्यानंतर त्या घरी जाण्यासाठी रिक्षा करून जात असताना, बळीराज चायनिज दुकानासमोर काळ्या रंगाच्या स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने मालती चव्हाण यांच्या गळ्यातील १ लाख १५ हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून अमृतधामच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348