मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिकः- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्रात जंगी स्वागत होऊन महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात शेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपूर्ण राज्यातील हजारो कार्यकर्ता सामील झाले होते. या यात्रेत नाशिक जिल्ह्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रेने महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षात नवीन संजीवनी मिळाली असल्याची तरी सध्या परिस्थिती दिसून येत आहे. या भारत जोडो यात्रेने काँग्रेस गतवैभव प्राप्त करणार काय ? याचे उत्तर समोर दिसून येणार आहे.
या यात्रेत नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रमेश साळवे, मनोहर आहिरे, प्रा. प्रकाश खळे, किशोर केदार, नंदकुमार मोरे, रवींद्र निकाळे, गणेश उबाळे, किशोर गुरव, अमोल मरसाळे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348